Friday, January 19, 2018

बायबलमधील डेविड-रचित स्तोत्र आणि शिवाजी महाराज



बायबलच्या जुन्या करारात ‘स्त्रोत्र संहिते’त २३ क्रमांकाचे स्तोत्र डेविडचे स्तोत्र म्हणून ओळखले जाते. हा डेविड म्हणजेच “David and the Goliath” कथेतील छोटा मुलगा. इस्रायलचा राजा सोलोमनचा पिता. या स्तोत्राच्या पहिल्या दोन ओळी काल एका मोटारीच्या मागे लिहिलेल्या दिसल्या.अनेक मोटारीच्या मागे असे संदेश लिहिलेले असतात. यात माझ्या कुतूहलाची गोष्ट म्हणजे त्या शब्दाशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र होते. त्यामुळे या ख्रिस्ती- स्तोत्राचा नवीन अर्थ शिवाजी महाराजांच्या संदर्भात मला उलगडला; तोच पुढे मांडतो आहे. माझ्या आकलनाप्रमाणे याची मांडणी करतो आहे,चांगले झाले तर ती ईश-कृपा समजावी; दोष आढळल्यास माझी चूक समजून घ्यावी.

The Lord is my shepherd, I shall not want.
आमचा सांभाळ करणारा परमेश्वर आहे, मेंढपाळ ज्याप्रमाणे आपल्या प्राण्याची काळजी वाहतो, त्याप्रमाणेच आमचा सांभाळ करणारा प्रत्यक्ष ईश्वरच, आमचा राजा होऊन आला आहे. त्याच्या (स्व)राज्यात आम्हाला कशाचीच कमी नाहीये. भगवद्गीतेत (अध्याय ९वा) “योगक्षेमं वहाम्यहम” म्हणून आश्वस्त करणारा आज शिवाजीच्या रूपाने प्रकटला आहे. तो शिवाजी राजा आमची मनापासून काळजी घेतो. मेंढ्या बर्यापैकी आळशी व बिनडोक असतात, अशा मूर्खतेच्या गर्तेत फसलेल्या जनतेला शिवाजीने स्वराज्याचा मार्ग दाखवला. परकीय लांडग्यांच्या तावडीत पडणार्या हिंदू-जनांस अभय दिले, संरक्षण दिले. मंगेशकरांच्या शब्दात “बहुत जनांसी आधारू” !!!
He makes me lie down in green pastures,
he leads me beside quiet waters
.
हे केवळ स्वराज्य नव्हते, तर ते सुराज्यही आहे. हिरवळीवर निवांतपणे बसणार्या मेंढ्या, म्हणजे सुरक्षिततेचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. तसेच, शांत पाणी हे स्वराज्यातील स्थिरतेचे द्योतक आहे. आमच्या शिवाजी राजाने आम्हाला असे स्थिर, संपन्न ‘स्वराज्य’ दिले आहे, असाच याचा अर्थ होतो.
He refreshes my soul.
He guides me along the right paths for his name’s sake.
असा आमचा शिवाजी राजा गुलामगिरी आणि पारतंत्र्यात कुजत पडलेल्या या देशाच्या आत्म्यास नवचैतन्य देतो. “हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तो ‘श्रीं’ची इच्छा” असे शिवाजी महाराजांनी सांगितले. हे अमुक शिवाजीचे वा भोसले कुटुंबियाचे कार्य नाही, तर धर्मसंस्थापना हे देवाचे कार्य आहे. त्या परमेश्वराचे कार्य तुम्ही करा, असे शिवरायांनी आपल्याला सांगितले आहे. या मार्गावर आम्ही सर्व मार्गक्रमण करीत आहोत. या मार्गावर आमचे नेतृत्त्व प्रत्यक्ष शिवाजी राजा करतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. “हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली” याचीच अनुभूती वरील शब्दातून मिळते.
 Even though I walk through the darkest valley,
I will fear no evil, for you are with me; your rod and your staff, they comfort me.
साडे-तीनशे वर्ष परदास्यात खितपत पडलेल्या या समाजात शिवाजी महाराजांनी नवचैतन्य निर्माण केले. विरोधात प्रत्यक्ष मुघल सल्तनत असताना, आपले आप्तही निराश व हतबल होऊन शत्रूच्या गोटात सामील होण्याचा तो काळ. अशा अंध:कारमय काळात स्वराज्याचा वन्हि शिवरायांनी चेतवला. आमचे राज्य, आमचा राजा अशा भावनेने गलितगात्र झालेले सामान्य जन हाती येईल त्याचे भाले तलवारी बनवीत मुघालांविरुद्ध उभे राहिले. “हर हर महादेव” म्हणत शत्रूसैन्याची धूळधाण उडवणारे ही हिंदूंचे सैन्य निर्भयपणे शत्रूला सामोरे जात होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी न घाबरता झुंजत होते. अशा अविश्रांत लढ्यातून जन्माला आलेल्या या स्वराज्यात, एका बाजूला भवानी तलवार आमचे शत्रूपासून संरक्षण करणार होती. तर, दुसर्या हातातील न्यायदंड प्रजेच्या हक्कांचे रक्षण करणार होता व दुष्कार्माला शासन करणारा होता. त्यामुळेच खंडोजी खोपडेचा उजवा हात डावा पाय कलम करणारा शिवाजी राजा व दुसरीकडे कल्याण सुभेदाराच्या सुनेची आदरपूर्वक पाठवण करणारा शिवाजी हि दोन्ही रूपे मेंढपाळाच्या हातातील rod व staff प्रमाणे आम्हाला आश्वस्त करणारी आहेत.
You prepare a table before me in the presence of my enemies.
You anoint my head with oil; my cup overflows.
यातील पहिल्या ओळीचा नीट संदर्भ मला लागलेला नाही. दुसर्या ओळीतील तेलाने डोक्याला मालिश करण्याचा अर्थ पुन्हा स्थैर्य व सुबत्तेशी जोडता येईल. my cup overflows याचा शब्दशः अर्थ न घेता “कप कधीच रिकामा होत नाही” असा घ्यावा, असे राब्बी सलमान श्चाक्टर शालोमी यांचे मत आहे. हे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वर्धिष्णू होणारे आहे, शिवाजी महाराज गेल्यानंतरही हे स्वराज्य संपले नाही, किंबहुना जे टिकले तेच स्वराज्य होते. त्याला कधीच ओहोटी लागली नाही, हे स्वराज्य प्रत्यक्ष औरंगजेबासही संपवता आले नाही, ते ओव्हरफ्लो होत थेट अटकेपार गेले !!!
Surely your goodness and love will follow me all the days of my life,
and I will dwell in the house of the Lord forever.

शिवरायांची ही गुणवैशिष्ट्ये – त्यांचे “आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वाज्ञपणे  सुशील” ही आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. हा प्रेरणेचा स्त्रोत आम्हा भारतवासीयांसाठी सदैव उपयोगी आहे. या प्रेरणेने ग्रस्त आम्ही सदैव या स्वराज्याच्या निर्मितीत रत राहू, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी स्वराज्ये निर्माण करू आणि अश्या स्वराज्यात, ज्यास प्रत्यक्ष “भगवंताचे अधिष्ठान” असेल, तिथे आम्ही निवास करू.               अर्धा मिनिटात त्या गाडीने स्वा. सावरकरांच्या “पुण्यभू” व्याख्येच्या मर्यादा तोडत या हिंदुस्थानातील हिंदू म्हणून स्वत:ला निर्विवाद सिद्ध केले. या देशातील महापुरुष, ज्याला धर्माच्या चौकटीत राहून ज्याला आपले म्हणता येतात, तो हिंदू का नाही ?? कल्पेशला वैयक्तिक असे वाटते की हिंदू-ख्रिश्चन म्हणजे काय , याचे उत्तर हा गाडीवान नक्की देऊ शकतो. किंबहुना, त्याने तो प्रश्न निकालात काढला सुद्धा !!! आधुनिक परिभाषेत धर्म-पुनर्संस्थापना करण्याची ही मी नांदीच मानतो... प्रश्न हा आहे कि इतर जन त्याकडे कसे बघतात ??... बघतात का ??

Tuesday, January 26, 2016

 EXPLAINATION

This explaination is with reference to the Question asked by me during the Guest Lecture on SHP, arranged on 4th of February, 2014.Given below is the question raised, followed by the explaination I found out appropriate.
Please read and feel free to comment on the same.

Que.: It was told by the Resp. professor that In a Hydroelectric Power plant, Potential Energy is converted into Kinetic Energy. On that my question was why we consider the total head to be H? Because, H is the total height from datum to the free surface of water. But, while calculating potential energy we consider the height from datum to the Centre of Gravity/Centre of Mass of the system and not it’s upper boundary. Thus, we should consider H till the CoG of the water reservoir…. and not it’s upper surface…

Proposed Answer: The Question has nothing to do with Potential Energy. (Recalling physicist W. Pauli’s statement- “Das ist ganz Falsch.”(that is all wrong).)
The answer lies in Bernoullis Equation(not modified, simple Bernoullis Equation.)
If we apply Bernoulis Equation between the two points-
                           1. Water level in the reservoir(Dam) and
              2. At inlet to the turbine, we get-

where, LHS refer to the reservoir upper level
and RHS refer to turbine inlet
 P : atmospheric pressure and is thus added on both sides.
Now, multiplying both sides with rg, we get -
                                                      <=>

Here, we observe that the RHS is equivalent to Kinetic energy per unit volume
( =
Now, for this case volume can only be expressed in terms of discharge Q ().
multiplying both sides by Q, RHS turns out to be Kinetic Energy supplied per unit time i.e. input power and it equals LHS =
Hence, we consider the H from datum till the free surface of water in the reservoir, and not till the CoG/CoM.
N.B. This answer is not to disrespect/dishonour the professor/organizers; indeed, I learned valuable new things about SHP from him. But, this question was discussed by professor & some students after the lecture with me. And that query needed to be answered… I personally think that we should be good at experience and formula both. So that when we get answer of 6 Kms, we should be able to find where we went wrong & accordingly modify or term a new formula. We should have Practical knowledge, as said in ‘3 idiots’. But, the question is should we blindly follow Aamir & throw away all “formulas & definitions” or we should be Honest with Engineering??
I choose the latter…
                                                                                                          Kalpesh N. Kothale
                                                                                                       (BE-Mech., 9421794652)

Wednesday, April 16, 2014

GAMES OF THRONESच्या निमित्ताने…


HBOया वाहिनीवरुन GAMES OF THRONES या मालिकेच्या तिसर्या पर्वातील दुसरा भाग प्रक्षेपित झाला अन् FaceBookवर प्रतिक्रियांचा ओघ सुरु झाला. यात आमचीही थोडी भर… एकूणच सात राज्यांची सिंहासनासाठीच्या ‘लढ्या’ची ही कथा… (त्यातील बिभत्सता वगळता)एक रंजक कथेची अर्हता प्राप्त… George Martin लिखित A Song of ice & Fireया कादंबरीमालिकेची त्याला बैठक आहे…..
स्तुति पुरे.. तर, मुद्दा असा की, Benioff व Weiss यांनी GAMES OF THRONES जगभरात लोकप्रिय केली, भारतात अशी मालिका का बनू नये???
आमच्याकडे कथा तयार आहे- महाभारत!!!
-GOTच्या कथेत केवळ सिंहासन हाच उद्देश, पण महाभारतात, त्यापुढे, जाऊन अनागोंदी संपवणे हा उद्देश आहे….
-जादु/काल्पनिकता दोहोंतही आहे, (माझ्या मते तर, महाभारत इतिहासच!) किती दाखवायची, हे आपल्या हातात आहे.
- ‘बिभत्सता’ हा काही कळिचा मुद्दा असतो, असे वाटत नाही. त्यास्तव, कपड्यांची कपात करु नये.. मालिका चलेगी..
- महाभारतात १८ पर्व आहेतच (Readymade), २ पर्व = १ Season असे केले तरी चालेल..

आता तुम्ही म्हणणार - “महाभारत आधीच बनवलंय…”, ओs आपण जागतिक पातळीवर प्रक्षेपणाच्या गोष्टी करीत आहोत… - How can we explain the non-Indian audience, how the arrows from opposite site hit each other at single point, that too apex of the arrow? आतापर्यंतचे महाभारत त्यामुळेच पडलेत धूळ खात. Star-Plusकृत महाभारतात तर व्यक्तिंपेक्षा मुकूट व वेषभूषाच अधिक अधोरेखित होतात… त्याबाबतीत पीटर ब्रुक्स-कृत फ्रेंच भाषेतील महाभारत(!) आजही आठवते… काय वाटतं ?? कुणी करणार का असा प्रयत्न ?? कुणी आपला नक्कीच करणार, पण, त्यासाठी आपल्याला आपला “देवभोळेपणा” (!!) थोडावेळ गुंडाळून ठेवावा लागेल… (हीच सगळ्यात मोठी अडचण वाटते आहे.) (प्रतिक्रिया…)    

Wednesday, January 15, 2014

German भाषा, श्रीदेवी आणि मी
काही दिवसांपूर्वी जर्मन पाहुण्यांना भेटण्याचा योग आला.
माझ्या थोड्या जर्मनभाषेत मी त्यांच्याशी संवाद बोललो-
माझा प्रश्न "Woher kommen Sie?" (कोठून आलात ?)
यावर उत्तर मिळाले- "Ich komme aus Deutschland." (मी Indiaतून आलो.)
आम्हा एतद्देशीयांना याचे उत्तर शिकवले जाते, ते असे- 
"Ich komme aus Indien." (मी Indiaतून आलो.)
माझ्यातील 'श्रीदेवी' अचानक जाग्रृत झाली:
"जर जर्मन लोक aus Deutschland, मग आम्ही "aus Hindusthan" का नाही?? 
आम्हाला "aus Hindusthan" का नाही शिकवल्या जात ???
Does anyone has explanation for this... ??
Otherwise from now onwards-
"Kalpesh kompt aus Hindusthan!!!!"
(some supplementary information:
Deutsch in the Germanic language is derived from the term for people or tribe. So Deutschland originally meant in German, "land of our people" or "land of our tribe". 
Germany comes from Germani in Latin. It is probably derived from the Celtic word for "neighbor". This is the term the Romans called their neighbors to the North who spoke the Germanic language. Similarly, India is derived from the word Indus )

'SHERLOCK'ED

"SHERLOCK"
- #MINDPALACE,
LIKED THE THIRD EPISODE.....
...Recalled my School-days when, due to my very love for Cricket, I used to watch everyone of my class play and I used to be away from them. That time I got the idea of making my own Mind-palace, actually it was a Mind-City named Kalp-Nagri; Unfortunately, I came short of Finance and the project Shrinked down to a small mansion with enormous rooms; but, even this wasn't completed and I completed only the Entrance to my Mansion and the Security check at entrance....
Thus, it UNDERLINES the fact that I am kalpesh and HE is SHERLOCK !!!

Sunday, December 29, 2013

जोशींच्या परदेशगमनाच्यानिमित्ताने.....


काल आमच्या senior मैत्रिण- रूचा जोशी उच्च-शिक्षणासाठी परदेशास रवाना झाल्या. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला फार कौतुक आणि अप्रूप वाटतं-परदेशात एकटं jaaNaa%yaaबद्दल... ३ वर्षांपूर्वी पुण्यास येतेसमयी आम्ही केलेली मानसिक कसरत आठवली..... घरापासून दूर कसे राहणार? मित्र कसे असतील? वगैरे.... या पार्श्वभूमिवर परदेशात एकटं jaaNaa%yaaबद्दल आदर वाटतो... आदर द्विगुणित होतो, जेव्हा एकटी जाणारी व्यक्ति स्त्री असते. एकटे जाण्याचे धैर्य कसेकाय एकवटता, त्याच जाणोत....
असो. (जोशींच्या परदेशगमनाच्यानिमित्ताने मला लिहायला आयते भांडवल मिळाले.)
सुंदर योगायोग आहे-
१००-१५० वर्षांपूर्वीची गोष्ट. स्थळ- पुणेच. एक नवपरिणीत ब्राम्हण जोडपं... आधुनिकतावादी श्रीमान व त्याकाळास अनुकूल गृहलक्ष्मी...अगदी लक्ष्मी-नारायणाचा जोडा ! पण, या नारायणाचे विचार वेगळेचत्याचे मनी, आपल्या रमेस गृहलक्ष्मीच बनवून न ठेवता अश्विनीकुमार बनविण्याचे ध्येय... आपल्या पतीच्या पाठबळावर, प्रस्थापितांविरुद्ध उभी राहणारी ही स्त्री म्हणजे सौ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. शनिपाराजवळ त्यांचं घर होतं. सौ.जोशी पुढे विलायतेस गेल्या. शिक्षण पूर्ण केले व भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला. सौ.जोशींचा लढा दोन ओळींत संपावा, असा नाहीच! शाब्दिक चिखलफेक व भौतिक शेणफेक हे प्रकार त्यांनीही सोसले. पण आपले व्रत सोडले नाही....
आज त्याच पुण्यातून, कु.जोशींना परदेशासाठी मार्गस्थ होताना पाहून सौ.जोशींना नक्कीच आनंद झाला असणार!!!
काळरूपी वारू चौखुर उधळीत, आज, या टप्प्यावर आपल्यासर्वांसह येऊन पोहचले आहे, की कोण-कुठला कल्पेश, जाहिररित्या
जोशींच्या परदेशगमनाची स्तुति करतो आहे.... त्याकाळी असे काही लिहिले असते, तर जोशींनंतर कोठाळेंना नक्कीच वाळीत टाकण्यात आले असते!!! यास्तव असे मनापासून वाटते की, आजचे आपले स्वातंत्र्य मुक्तपणे उपभोगताना, त्याकरिता कष्ट सोसलेल्या असंख्य व्यक्तिंबद्दल, आपण कृतज्ञ असावे. तेही कठीण वाटत असल्यास, कमीतकमीकृतघ्नतरी होऊ नये. (जैसे सुचले, तैसे अंकिले.)